Monday, November 14, 2022

हे सांगायला हवं


 आजचा पुस्तक परिचय लिहायला हाती घेताना बऱ्याच दिवसांनी वाचन पूर्णत्वास गेल्याची भावना आहे .अगदी ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे ०४:०० वाजता जाग आली आणि रेंगाळत चाललेले न्या. मृदुला भाटकर लिखित "हे सांगायला हवे" हे पुस्तक वाचून संपवले.


गो नी दा च्या "शितू" नंतर मधल्या काळात  वाचन सुरूच होते पण पूर्णत्वास जात नव्हते आणि जे काही पूर्णत्वास गेले त्याचा परिचय लिहायला सुर जुळून येत नव्हते.

आज सकाळी पुस्तक हाती घेतले तेव्हा उरलेल्या पानांची संख्या बघून लक्षात आले की सकाळी ०६:०० वाजेपर्यंत पुस्तक वाचून पूर्ण होईल मग लगेच पुस्तक परिचय लिहण्याची सुरसुरी आली ."हे सांगायला हवे" हे पुस्तक  २-३ दा वेगवेगळ्या संदर्भात सुचले होते पण टायमिंग जुळून येत नव्हता. शेवटी २ आठवड्यापूर्वी झाडीपट्टीतील तूरडाळ विषयीची फेसबुक पोस्ट वाचली आणि पुस्तक वाचायचे ठरवले.

कै. श्री. रमेश भाटकर (प्रसिद्ध नाट्य आणि सिने अभिनेते ) यांना  बलात्काराच्या  खोट्या केस मध्ये ठरवून अडकविण्यात आले होते आणि ह्या एका केस ने न्या.मृदुला भाटकर आणि कै. श्री. रमेश भाटकर यांच्या जीवनात काय बदल घडवून आणले हा उपरोक्त पुस्तकांचा मूळ गाभा आहे आणि ह्या गाभ्या भोवती बऱ्याच आठवणी सरकारी व्यवस्थेतील कुरघोड्या, राजकारण्यांचा राजकीय स्वार्थासाठी न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप ,या सर्व प्रकारातून आलेल्या नैराश्य व वैफल्य याविषयीच्या कहाणी सदर पुस्तकात मांडल आहे.

न्या मृदुला भाटकर यांनी  राज्याच्या आणि देशाच्या जनमानसात सदृढ  न्याय व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या बऱ्याच महत्त्व पूर्ण खटल्यांवर न्यायाधीश म्हणून काम केले व स्वतःचा ठसा उमटवला आहे . त्यात जळगाव वासनाकांड ,मुंबई लोकल बॉम्ब स्फोट , मालेगाव बॉम्ब स्फोट यासारखे महत्वपूर्ण खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केले तसेच त्या मोक्का न्यायालयाच्या न्यायमूर्ती असताना सारा सहारा सारखे संवेदनशील प्रकरण निकाली काढले .

कदाचित त्यांच्या ह्या निष्पक्ष आणि निर्भिड न्यायदानाच्या शैली मुळे व्यवस्थेत त्यांचे बरेच हितशत्रू निर्माण झाले आणि त्यांनी पुस्तकात नमूद केल्या प्रमाणे त्यांच्या ह्या शैली ची किंमत कै रमेश भाटकर यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करून हिशोब चुकते करण्याच्या किंवा त्यांना झुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या सर्व प्रकाराला त्या कश्या सामोऱ्या गेल्या या सर्वासाठी तसेच,

इंटरनेटच्या क्रांती मुळे उदयास आलेल्या विविध आभासी समाज माध्यमात व २४ चालणाऱ्या वृत्त वाहिन्यात सातत्याने चालणाऱ्या  चर्चा सत्रातून  न्यायव्यवस्थेला समांतर अशी न्यायालये चालवली जाऊ लागली आहेत आणि या समांतर न्याय व्यवस्थेने जल्पकांच्या (Trollers) टोळ्या जन्माला घातल्या आहेत अशासच एका जल्पकाचा (Troller) न्या मृदुला भाटकर यांना त्यांनी एका सामजिक संस्थेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात न्याय बुध्दीला स्मरून दिलेल्या निकालावरून सामना करावा लागला काय होता तो निकाल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशद्रोह म्हणजे काय विषयाची तपशील जाणून घेण्यासाठी जरूर वाचा "हे सांगायला हवं"

No comments:

Post a Comment

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...