Monday, January 11, 2021

अंगार मळा


अंगारमळा 

शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक २०२०(The Farmers (Empowerment and Protection) Agreement on Price Assurance and Farm Services Act, 2020 ) , 'कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२० (Farmers’ Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Ordinance, 2020) व अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२० (Essential Commodities (Amendment) Act, 2020 ) असे तीन कायदे भारतीय संसदेने आवाजी मतदानाने मंजूर केले . द वायर ह्या संकेस्थळाच्या संदर्भानुसार भारतीय संसदेने ४ तासाच्या कालावधीत ७ विधेयके संमत करून घेतली , मनाला थोडी सुखावणारी भावना होती . अगदी गेली ६०-६५ वर्षे गोगलगायीच्या गतीने रांगणारे भारताचे कायदे मंडळाने मनापेक्षा (माझ्या मते जगातील सर्वात वेगवान गोष्ट ही मन आणि मनाचे विचार आहे कारण ते काही निमिष स्थिर राहू शकतात अन्यथा फुल पाखरा प्रमाणे ते बागडत असतात) जास्त वेगाने निर्णय घ्यायला सुरवात केली . परिणाम स्वरूप गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून राष्ट्रीय राजधानीच्या (नवी दिल्लीच्या) विविध सीमा वरून होणारी वाहतूक पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या राज्यातील साधारणत ४०० हून अधिक शेतकरी संघटनांनी अडवायला सुरुवात करून दिल्ली भोवती सर्व बाजूंनी पाश आवळायला सुरुवात केली आणि आज रोजी देखील ते पाश सुटायचे नाव घेत नाहीये तर दिवसेंदिवस गहिरे होत चालले आहेत.

अर्थातच आजच्या ह्या सर्व लिखाणाचा उद्देश हा कृषी कायदे कसे चांगले किंवा वाईट आहेत, सध्याचे केंद्रातील सरकार उत्तम आहे वा टाकावू आहे . याबद्दल तर अजिबातच नाही कारण आपण अस्मादिक काय लय तोफ लागून गेलेला नाही किंवा सूर्याच्या खाली दिसणाऱ्या आणि घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर आपले मत मांडले पाहिजेच नी असेलच पाहिजे,पण काय करतात पुण्यात आल्यापासून नी सदाशिव पेठेत शिकल्यामुळे,  प्रत्येक गोष्टीत आपल्या  प्राप्त माहितीतून मांडलीच पाहिजे ना …

असो अर्थात गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून सुरू असणाऱ्या ह्या आंदोलनाने बऱ्याच चर्चा चरवितचर्वण सुरू झाले आहे . आम्हा भारतीयाचा सर्वात आवडता एक छंद म्हणजे प्रत्येक गोष्ट इतिहासाशी पडताळून पाहायला खूप सुख वाटतं अमक्याच्या काळात एवढा मोठा मोर्चा झाला होता . अमक्याने तमक्याला अशी धोबी पछाड देऊन खाली लोळवले होते , तमक्याने रेकॉर्ड ब्रेक उपोषण केले की त्यांची चक्क गिनीज बुकमध्ये नोंद झाली,कोणी तरी कोणालातरी कात्रजचा घाट दाखवला होता इत्यादी इत्यादी .अजून सध्या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनात कसे अतिरेकी सामील झालेले आहेत त्यांना विदेशातून निधी येतो आहे . शेवटी हे शेतकरी कसे पंचतारांकित सुविधा उपभोगत आहे आणि बरेच काही  .  


ह्या सर्व चर्चा सुरू असताना महाराष्ट्रामधील एका दिवंगत शेतकरी नेतृत्वाची पण चर्चा सुरू झाली , की ते जर आज असते तर काय झाले त्यांनी काय निर्णय दिला असता.  त्यांच्या विचारांनी महाराष्ट्रातील  शेतकरी पेटून उठले असते की सत्ताधाऱ्याच्या सुरात सूर मिसळला असता पण म्हणतात इतिहासात जर तर ला स्थान नसते . कदाचित म्हणूनच दिवंगत व्यक्ती व्यक्ती शरीराने वर्तमानात नसली तरी त्यांच्या विचार त्यांनी लिखित साहित्य रूपात शिदोरी  पिढ्यान् पिढ्या मार्ग दर्शन करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे .

ह्या सर्व परिप्रेक्षात शेतकऱ्याचे पंच प्राण असणारे दिवंगत कै.शरद जोशी यांचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्रातील किंबहुना भारतातील शेतकरी चळवळ आणि तिचे नेतृत्व यांचा इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही .म्हणूनच त्यांचे लिखाण वाचावे  व त्यातून काही त्यांच्या विचारांचा त्यांनी तत्कालीन घेतलेल्या भूमिकांचा ,व्यवस्थेशी केलेल्या संघर्षाचा धांडोळा घेण्यासाठी  अंगारमळा ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा आत्मकथन विभागासाठी प्रथम पुरस्कार प्राप्त झालेल्या पुस्तकांची मी निवड केली . तसे कै शरद जोशी ह्यांच्या बद्दल माझ्या संग्रही अंगारमळा व्यतिरिक्त श्री .भानू काळे लिखित अंगारवाटा शोध शरद जोशींचा व वसुंधरा काशीकर लिखित शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा हे देखील आहेत .

तसे पाहता अंगारमळा व अंगारवाटा शोध शरद जोशींचा  हे माझ्या संग्रही २०१८ पासून होते . वेळ मिळेल तेव्हा किंवा काही संधर्भ लागला की तुकड्या तुकड्यात वाचले पण म्हणतात बैठक मारून एका बैठकीत पुस्तक संपविण्याचा आनंद काही औरच त्या शिवाय ते पुस्तक वाचल्याचा व रिचवल्याचा आनंद येतच नाही ना . म्हणून गेल्या आठवड्यात ही दोन्ही पुस्तके उचलेली आणि वाचून फडशा पाडला . तसे अंगारमळा हे स्वतः शरद जोशींनी लिहलेले १९ प्रकरणे आणि १९३ पाने असणारे छोटेखानी आत्मकथन ह्यात शेतकरी संघटनेचे नियतकालिक असलेल्या 'साप्ताहिक ग्यानबा ' व 'साप्ताहिक वारकरी ' यातील काही राहून गेलेले लेख आहेत . ज्यात शेतकरी संघटनेची सुरवातीची जडणघडण एक सनदी अधिकारी ते शेतकरी नेता आणि त्या वाटचालीत लाभलेले सहकारी यांच्या आठवणी आहेत .


मुळात अंगारमळा वाचताना बरेच प्रश्न पडले की का ह्या व्यक्तीला आपल्या सरळधोपट मार्गाने आणि अगदी सुखासीन पद्धतीने विदेशातील (स्वित्झर्लंड मधील ) नोकरी सोडून भारतात येऊन चाकण जवळ २५ एकर शेती घेऊन त्यात प्रयोग करावेसे वाटले असतील काय असेल मानसिकता.  कारण शरद जोशी हे काही साधेसुधे नव्हते व्यक्तीमहत्व नव्हते अगदी ज्या काळात भारतात सुशिक्षितांचा वानवा त्या साठीच्या दशकात ते सिडनहॅम महाविद्यालयातून कॉमर्स शाखेत द्विपदवीधर झाले होते आणि अगदी महाविद्यालयीन शिक्षण संपताच केंद्रीय लोकसेवा आयोगाची सनदी सेवेची कठीणतम् परीक्षा ते उत्तीर्ण होऊन भारतीय टपाल सेवेतील अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली होती व पुढे ह्याही सेवेचा राजीनामा देऊन स्वित्झर्लंड येथे युनिव्हर्सल पोस्टल युनियन मध्ये नोकरी देखील रुजू झाले होते. कदाचित असेल खतरो से खेलने का शौक म्हणून दिला असेल का राजीनामा आणि असतील का भारतात ,की खरंच भारतातील शेतकऱयांचे जीवनमान त्यांना उंचवायचे असेल असेलही .

साधारण २००६ साली राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला . त्या पक्षाच्या ब्लू प्रिंट प्रमाणे राज ठाकरेंना अभिप्रेत असलेला शेतकरी हा जीन्स टी शर्ट मधला पण कदाचित ब्लू प्रिंट तयार करणाऱ्याला कदाचित शरद जोशी माहित नसावे किंवा त्यांचा उल्लेख टाळायचा असावा . नुकतेच विदेशातून आल्यामुळे अगदी पूर्ण वेळ शेतकरी म्हणून शेती करत असताना देखील सुरवातीचे बरेच वर्षे शरद जोशी जीन्स टी शर्ट मध्येच वावरत होते . अगदी बऱयाच सहकार्यांनी सल्ला देऊन देखील त्यांनी तो पेहराव बदलला नव्हता .   


अगदी शरद जोशीनी शेती व्यवसायाबद्दल मते व्यक्त करताना लिहून ठेवले आहे कि

जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे . प्रकृती आणि मनुष्य एकत्र आल्यावर तो निर्माण झाला . पंच महाभूतांच्या लक्षावधी वर्षाच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमाचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात . एका दाण्यातून शंभर दाणे तयार होण्याचा चमत्कार शेतीच होतो . ज्या दिवशी हे लक्षात आले ,त्या दिवसापासून शेतीमध्ये तयार झालेली हि बचत लुटून न्यायला सुरवात झाली . आज पर्यंतच्या इतिहासाची खरी प्रेरणा हि शेतीमध्ये होणार गुणाकार लुटण्याची आहे .

कदाचित ह्या सर्व लुटी पासूनच त्यांना शेतकऱयाला वाचवायचे असेल काहो कि अजून काही असेल त्यांच्या मनात .ह्या सर्वासाठी आणि किंबहुना याहून अधिक मला भावलेल्या खालील दोन प्रकरणासाठी अंगारमळा जरूर वाचा

प्रकरण ११ :एका कामगार चळवळीचा अंत : हे प्रकरण कै. कामगारनेते दत्ता सामंत यांच्या शरद जोशी व शेतकरी संघटनेशी असलेल्या नात्यावर आहे .

प्रकरण १७:'अनिल ' जादूच्या दिव्यातील राक्षस : हे पूर्वश्रमीचे राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे नंतर शेतकरी संघटनेत आलेले आणि आजच्या वर्तमानात महाराष्ट्रात लोकसंग्राम नामक पक्ष चालवणाऱ्या श्री अनिल अण्णा गोटे यांच्यावर बेतलेलं आहे . हे प्रकरण वाचून अगदी थक्क व्हायला होते कारण मला श्री गोटे माहिती पडले ते तेलगी घोटाळ्यामुळे पण हे नव्हते माहित कि त्यांनी त्यांच्या पूर्वायुष्यात एवढा मोठा संघर्ष केला आहे .प्रसंगी लाठ्याकाठ्या खाल्या आहेत . अगदी शरद जोशी त्यांना बहिर्जी नाईक यांची उपमा देतात असेलही कारण पुस्तकात लिहल्या प्रमाने जे छगन भुजबळ साहेब १९९१-९२ साली काँग्रेस मध्ये गेले व त्यांना शिवसेनेतून फोडण्याचे श्रेय आदरणीय पवार साहेबांना मिळाले ते श्रेय श्री अनिल गोटे यांना १२ डिसेम्बर १९८७ रोजीच मिळाले असते जर श्री भुजबळ त्यांना येऊन मिळाले असते .





तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...