Sunday, December 18, 2022

दाल गंडोरी-चाल जाऊ आपला देस ले

 

दाल गंडोरी-चाल जाऊ आपला देस ले
जवय हाऊ मोबाईल फोने सणे जमारा नव्हथा तवय म्हना खानदेस मधल्या सासुरवाश्या मायबहिणी आया बाया दर सने सुदे नी दिवाई ,आखाजीना टाइमले घर म्होरला कावळा कडे डोळा लाई बशेल ऱ्हाये तो कावया कोकायना की त्या आया बाया अंदाज बांधेत का आज सकाय मा तिले लेवाले मुराई यी आन ती माहेरले जाई सन मसालानी नही ते साधी खिसडी खाई .....
अम्हणी अहिराणी बोली मा खिचडी ले खिसडी म्हणतेस रोज संध्याकाळे तुम्हीन जर खानदेसना गावो गाव न्या गल्ल्यास मा भवडी उनात ते ह्या खिसडी वास सरशे तुम्हान पोट भरी जाई .हाई खिसडी खानदेसना लोके गहिरी आवडी आवडी खातास ह्या खिसडी चर्चा इतली शे का ती खानदेस ना गा गीतेस मा बी यी लागेल शे म्हणून श्री अशोक भाऊ कोतवाल यासना दाल गंडोरी ह्या पुस्तकं म्हाईन मे ते गीत खास तुम्हांना साठे आठे अन शे
मन्हा खानदेसमझार,केई ,कपासी ना खेते
नही तांदुईना दाना ,भात खिसाडीना साठे
आंडेर (लेक) उनी माहेरले ,रांधू घाऱ्या आनी पुऱ्या
तोंड लावले शिजाडू ,मुंग चवयीन्या घुगऱ्या
ईन जवाई लेवाले ,तवय तांदूई लयसू
दूध मलईनी खीर ,भज्या ,गुलगुल्या तयसु ….
वरील गीतात एक स्त्री सांगते आहे कि खान्देशात कपाशी ,केळी महामूर पिकते पण खिचडी साठी डोळ्यांना तांदुळाचा दाणा दिसत नाही . मुलगी माहेरला आली तर तिला मूग ,चवळीच्या घुगऱ्या खाऊ घालाव्या लागतात . जेव्हा जावई न्यायला येईल तेव्हा मी बाजारातून तांदूळ आणून त्याच्यासाठी दूध मलईची खीर बनवीन . अशी गरीबी तरी आलोखी पण तांदुळाचा तुडवडा त्या काळी होता . अर्थात नंतर तांदुळाचे भरघोस उत्पन्न संध्याकाळी खिचडी करून खाणे ही पर्वणीच समजली जाऊ लागली आणि खान्देशात खिचडीची लाटाच आली ,असं म्हटलं तर वावगं ठरू नये !
पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेत नमूद केल्या प्रमाणे खानदेशी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खानदेशी स्त्रियांच्या चवदायी हातांना .... हे पुस्तक अर्पण करण्यात आले आहे त्याचं सुगरणीने एखादा खाद्य पदार्थ शेवट्याच्या क्षणी उपलब्ध असणाऱ्या जिन्नस सामानातून कसा जन्माला घातला व आयडिआ करून भुकेल्याच्या भूकेचा सयड्या कसा मारला याच्या कथा ,किस्से खुमासदार पद्धतीने संपूर्ण पुस्तकांत पेरलेल्या आहेत जे वाचकांची प्रत्येक कथेबरोबर पुस्तक वाचनाची भूकही ही वाढवता आणि पुस्तक पूर्ण वाचून करून बौद्धिक भूक तृप्तीचा आनंदी ढेकर देण्यास भाग पाडतात.
भारतात दर सव्वा कोसांवर भाषा बदलते असे म्हटले जाते आणि त्या भाषेबरोबरच मग राहणीमान व खाद्य संस्कृतीही ही बहरते . त्या खाद्यसंस्कृतीच्या बहरण्याला त्या परिसरातील जमीन ,हवा, पाणीचा पीक पद्धतीची भूमिका फार महत्वपूर्ण असते.अशीच अहिराणी भाषे सोबत खानदेशी जमीन ,हवा ,पाणी आणि पीक पद्धती वैशिष्ट्य पूर्ण आहे . ह्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृतीतून श्री अशोक कोतवाल यांनी दाल गंडोरी ह्या कथा संग्रहाद्वारे ११ वेगवेगळ्या खानदेशी खाद्य व्यंजनाची व खानदेशी माणसाच्या अगत्याची ओळख करून दिली.
शिक्षण ,काम धंदा ना निमित खाल तुम्हण आम्हण गाव सुटणं कुठं यी लागनूत ह्या दूर देस ले आते काम ना व्याप ना पायरे आठून काई निघणं होत ,पन तीन्ही सांजा झायात का मन काहि आठे ठेरत नही ते निघंस मंग भवडाले गाव वर सोडी येईल वावरे शिवरेस मा ,जास गव्हाणनी खुट्टाले बांधेल ढोरे ढाकरे स मा , गावना मारोती , म्हसोबानं ,आया माउलीसनी ना पार वर जर तुम्हले बी ह्या यादा येती व्हतीन ते उठा तुम्हणी निंघा गावकडे आन जर तुम्हनी लाडी नशी जर शी येत
तिले समजाडा साठे ह्या दोन ओळी म्हनाले चुकू नका
उठ वो लाडी नेस वो साडी
चाल जाऊ आपला देस ले
लाडीस ले बी सांगणे शे तुम्हना लाड्या न मन कायी मोडू नका नी ख़ुशी सांगा
चाल रे लाडा येस मी आते
चाल जाऊ आपला देस ले ..... ।।
म्हनीसन श्री अशोक कोतवाल यासनी मराठी साहित्य ना चुल्हा मांडीशीन त्यानं वर जी दाल गंडोरी शिजाडेल शे अन पुस्तक ना रूप मा तुम्हांना आम्हना म्होरे वाढेल शे ते बठ्ठा सनी वाचो व त्या मा देईल सर्वा पाककृती आपला घर मा बनाडी आपला अजु बाजु ना स ले चुल्हा ले निवतं दी सन खावाडो व खुस होवोत हाई आपलें हात जोडी इनंती शे !!!

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...