Monday, October 19, 2020

मी वाय सी


 मी वाय सी

तसं मी वाय सी दुसऱ्यांदा वाचायला घेतलेलं आत्मचरित्र पहिल्यांदा २००७–०८ मध्ये सार्वजनिक वाचनालय (सावाना), नाशिक चा सदस्य असताना वाचले होते. पण काही पुस्तके असतात वारंवार वाचावी अशी की जी मनाच्या कोपऱ्यात कायम स्थान करून बसलेली असतात जशी संधी मिळाली की डोकावतात आणि परत परत वाचायला उद्युक्त करत असतात त्या पैकीच एक मी वाय सी.

मी वाय सी हे मी मुंबई पोलिस दलाचे एक धाडसी आणि धडाडी चे अधिकारी होते . श्री.यादवराव पवार (वाय सी ) यांचे चरित्र परत वाचण्याचे आणखी एक कारण म्हणजे ते खानदेशातील त्यांचे मूळ गाव हे धुळे जिल्ह्यातील निमगुळ आहे  आणि मी स्वतः खानदेशातील असल्या मुळे म्हणा तो सॉफ्ट कॉर्नर मनाच्या कोपऱ्यात कायम असतोच नी आहे.

श्री वाय सी पवार यांनी त्यांच्या नोकरीची सुरुवात गुणवत्ता निरीक्षण विभागातून सुरू केली , पुढे ते राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पास होऊन तहसीलदार ह्यां पदी निवड झाली पण तेथे जीव रमत नव्हता अंगावर वर्दी घालण्याचा शौक होता त्यामुळे पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बसले  यशस्वी होऊन त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी नेमणूक झाली .त्यांची पोलिस उपअधीक्षक पदी निवड झाल्या नंतर चा पोलिस प्रशिक्षण अकादमी तील प्रशिक्षण  काळा नंतर त्यांनी त्यांची पोलिस विभागातील कारकीर्द नाशिक जिल्ह्यात सुरू केली ही सर्व कारकीर्द १९७० च्या दशकातील त्यात त्यांनी सिन्नर शहरातील दंगल आणि तणावग्रस्त स्थिती यशस्वी पणे हाताळली . त्यावेळी नाशिक जिल्ह्यात गाजलेल्या शुभांगी सोहनी खून खटल्याचा तपास अतिशय काळजीपूर्वक करून या प्रकरणातील आरोपींना गजाआड केले.

नाशिक शहरातील त्यांची ही कारकीर्द बघून त्यांना नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे उभ्या महाराष्ट्रात जातीय दंगली आणि दोन धर्मातील तणावामुळे अशांत शहर अशी ओळख असणाऱ्या मालेगाव शहराच्या पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आणि याचं मालेगाव शहरातील अनुभवांनी त्यांना परिपक्व बनवले.मग त्यातील मालेगावातील गणपती ची मिरवणूक असेल त्यात निर्माण झालेला तणाव ,माजी आमदार बरोबर चा पंगा आणि त्याच बरोबर त्यांना मिळालेले मालेगाव करांचे प्रेम. मालेगावातील यशस्वी २ वर्षाच्या कार्य काळानंतर त्यांची महाराष्ट्रातील विविध शहरात नी पोलिस विभागाच्या वेगवेगळ्या शाखेत बदल्या होत राहिल्या त्यांचा स्वभाव स्वाभिमानी असल्या मुळे शासनाचा आदेश शिरसावंद्य मानून ते त्यांची सेवा देत राहिले.त्यांच्या कार्य शैली मुळे त्यांना विविध पदे देखील मिळत कधी संघर्ष करावा लागला कधी न मागता मिळाले कधी डावलले गेले या सर्वाचा त्यांनी पुस्तकात खुलासा केला आहे .

वाय सी पवार हे तसे माझ्या पिढीच्या दृष्टीने असे जास्त ओळखीचे नाही कारण त्यांची कारकीर्द विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संपली पण ह्या पुस्तकामुळे बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या जसे उल्हास नगर मधील रिंकू पाटील हिचे हत्याकांड ह्या प्रकरणा विषयी ऐकून होते कारण ते त्या हत्याकांडातील आरोपींनी वापरलेल्या मोडस ऑपेरांडी नुसार खूप भयंकर होती कारण एकतर्फी प्रेमातून आरोपीने एस एस सी बोर्डाची परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त असताना देखील ज्वालाग्राही पदार्थ टाकून रिंकू पाटील ला पेटवून दिले व त्यात तिचा मृत्यू झाला व पप्पू कलानी यांच्या समर्थकांनी घटना घडताच त्या स्थळाचे व्हिडिओ शूटिंग केले त्यातून प्रचंड तणाव निर्माण झाला होता. रिंकू पाटील प्रकरणानंतर त्यांचा मुंबई पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून प्रवेश  धारावी  सारख्या संवेदनशील भाग , अवैध दारू निर्मिती (हात भट्टी ची दारू ) आणि वरद राजन मुदलियार (विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित चा दयावान हा चित्रपट ह्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे ) ह्या सर्वांशी एकहाती सामना त्याचं दरम्यान गुन्हेगाराकडून न्यायालयात खटले आणि पोलिस दलातील सहकार्याचा असहकार पण रिबेरो साहेब सारख्या वरिष्ठ नेतृत्व कडून झालेली पाठराखण व या संकटाचा बीमोडयाचं सह मुंबईच नव्हे संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या १९९३ बॉम्ब स्फोटाच्या कटाचा तपास आणि वाय सी यांचा त्यातील यशस्वी सहभाग पण काही चित्रपट आणि पुस्तके जसे हुसैन झैदी लिखित ब्लॅक फ्रायडे यांनी या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून फक्त एका विशिष्ठ अधिकाऱ्याला फक्त श्रेय दिले आहे परंतु इतिहास तसा नसून त्या घटनेचा छडा लावण्यासाठी वाय सी यांचा सहभाग किती महत्वाचा आहे हे सर्व यातून समजते.

मुळात हे पुस्तक एका सीरिज साठी एक चांगला संदर्भ ठरू शकते यात शंका नाही


का वाचले पाहिजे

१.पोलिस दलातील अंतर्गत वाद

२. श्रेयासाठी पदकासाठी चे राजकारण

३. दलित असल्यामुळे भोगावे लागणारे त्रास


कोणी वाचले पाहिजे

१.पोलिस फक्त भ्रष्ट असतात असे मत असणाऱ्यांनी

२. पोलिसानं बद्दल प्रतिकूल मत असणाऱ्यांनी

३. प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी

#मीवायसी

#बुकरिव्ह्यू

#चिनारप्रकाशन

#IPS

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...