Saturday, November 26, 2022

अंतर्यामी खजुराहो


 अंतर्यामी खजुराहो

ऐतिहासिक कादंबऱ्या वगळता,कादंबरी,कथा आणिकविता संग्रह हासाहित्य प्रकार आजपर्यंत मी जे काही थोडं फार वाचतो त्या वाचन सवयीतून दुर्लक्षित असलेला किंवा कटाक्षाने टाळलेला साहित्य प्रकार होता .अगदी शाळेत इसापनीतीच्या चातुर्य कथा- आणि बिरबल अकबराच्या कथा चे वाचन वगळता ,कथासंग्रह हा साहित्य प्रकार माझ्या वाचनात दुर्लक्षितच आहे. परंतु गेल्या एक दोन वर्षात वाचन करत असताना सातत्याने वाचनात कथासंग्रहआणि कादंबरींचे उल्लेख हे मला ठळकपण जाणवू लागले व त्यामुळे कै.भाऊ पाध्ये व कै.जयंत पवार यांच्या लिखाणाशी थोड्याफार प्रमाणात ओळख झाली . किंबहुना म्हणूनच मी चरित्र ,आत्मचरित्र ह्या वास्तववादी साहित्य प्रकाराकडून कथा, कादंबरी सारख्या लेखकाच्या प्रचंड अश्या कल्पनाशक्ती व सृजनातून निर्मिलेला साहित्य प्रकार प्रयत्नपूर्वक वाचतोय.
अशाच कादंबऱ्या धुंडाळताना मला गोपाळ आजगावकर यांची अंतर्यामी खजुराहो ही कादंबरीअगदी अनपेक्षित रित्या गवसली . मुळात वाचन करताना मी बहुतांश वेळा ते उद्देश ठेवून वाचत असतो आणि वाचनाचे विषय हे कामगार आणि औद्योगिकक्षेत्रा संबंधित जास्त असतात . त्यामुळे जेव्हा ह्या कादंबरी संबधी माहिती वाचताना मुंबईतील गिरणीकामगाराचा संप हा शब्द दिसताच विकत घेतली आणि अधाश्या सारखी वाचून काढली.
मुळात मानवी मन हे भूतकाळात जास्त रमते त्यामुळेच आजकाल आपण सर्व गोष्टी ह्या रेट्रो (retro ) स्वरुपाच्या शोधत असतो .म्हणूनच आजकाल कपडेलत्ते,राहणीमान किंवा वाहनाच्या डिझाइन (Design ) ही ह्या परत ६०-७० च्या दशकाकडे पुन्हा एकदा झुकू लागल्या आहेत. History is cyclical असा वैचारिक प्रवाद देखील आहे.
प्रा. हरिश्चंद्र थोरात यांनी ब्लर्बमध्ये कादंबरीची प्रशंसा करताना लिहले आहे की “गोपाळ आजगांवकर यांच्या या कादंबरीमधून सत्तरीच्या दशकातील महानगरीय सामाजिक-सांस्कृतिक विश्व प्रत्ययकारक रीतीने उभे राहते ”. मराठी सामाजिक कादंबरीतून ग्रामीण समाज जीवन आणि त्याचे चित्रण मोठया प्रमाणात लिहले गेले आहे परंतु ,महानगरीय समाजजीवनाच्या बाबतीत सामाजिक चित्रण हे फार थोड्या प्रमाणात आहे किंवा ते माझ्या वाचनात आलेले नाही . ती कमी अंतर्यामी खजुराहो ही कादंबरी भरून काढताना दिसते .
७०च्या दशकापासूनचा कालखंड हा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या बंडखोरीचा किंवा प्रस्थापितांपासून वेगळे अस्तित्व मांडणारा कालखंड मानला आणि ह्याच सत्तरीच्या दशकात नुकत्याच उदयास आलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या दासू ह्या नायकावर आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा सामाजिक दृष्ट्या काय परिणाम होतो याचे विवेचन लेखकाने ताकतीने केले आहे .
कादंबरी येणारे स्त्री पुरुष यांच्यातील शरीर संबंध ,स्त्री पुरुष जनेंद्रिया संबंधित येणारे वाकप्रचार,म्हणी ,गुप्त नावे किंवा नायकाने स्वतःच्या लैंगिक भानाचा निचरा करताना वापरलेले वाकप्रचार आणि ह्याच लैंगिक संबंधाच्या बाबतीत नायकाचे नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी चालणाऱ्या विचारांचे चित्रण वाचून कादंबरी अश्लीलतेकडे झुकते की काय असे बऱ्याचदा वाटते.
अगदी ह्या नैतिकता आणि अनैतिकतेच्या व्याख्या विषयी वैचारिक हिंदोळे घेत असताना नायकाच्या मनातून मन आणि शरीर या बद्दल एक विचार करायला भाग पाडणारा स्वसंवाद अगदी सहजच येतो "मन आणि शरीर यांच्यात मोठा फरक आहे. मनाने काहीही केलं तरी चालतं . ते दडून राहत . त्याचा फारसा त्रास होत नाही . पण शरीराने काही केलं की ते कर्म होतं आणि ते आयुष्यभर आपणाला चिटकून राहते".हा विचार अगदी झटकन वर्तमानात आणून सॊडतो कारण आपण देखील कदाचित आपल्या कटुंबातून व सामाजिक जडणघडणीतून प्रत्येक शाररिक कृती ही नैतिकतेच्या आणि अनैतिकतेच्या कसोटीवर ताडून बघत असतोच ना ?
नायकाच्या या मनोकायिक आख्यानाबरोबर ७०च्या दशकांत मुंबई महानगराच्या राजकीय पटलावर बजाव पुंगी हटाव लुंगी सारख्या तीक्ष्ण भाषिक आणि प्रांतीय विभाजनाच्या जाणीवा असणाऱ्या हिंद सेना नामक संघटनेचा उगम आणि वाटचाल ही तेवढ्याच ताकतीने कादंबरीत मांडण्यात आलेली आहे.ह्या हिंद सेनेच्या वाढत जाणाऱ्या शाखा व त्या गिरण कामगारांच्या मुलाचा सहभाग हा कुठेतरी प्रस्थापित डाव्या पक्षांचा बिमोड करून क्षीण होत चाललेल्या डाव्या संघटनांची जागा घेताना दिसतो.
मानवी मन राजकीय विचार करताना , शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शरीर सुखातून समाधान मिळवण्यासाठी सातत्याने- संधी शोधात राहते व कृती करण्याअगोदर हे विचार नैतिक अनैतिकतेच्या चौकटीतून मनातल्या मनात तावून सुलाखून ही घेते पण कृती करताना स्खलन पावते . मग ह्या स्खलनातून येणारे सुखाचा आस्वाद घेण्या बरोबरच शारीरिक कृती पाप पुण्याच्या कसोटीत मोजत बसते याचा प्रत्यय कादंबरी वाचताना सातत्याने येतो .
कादंबरीच्या नावाची फोड करून जर शब्दश अर्थ काढल्यास अंतर्यामी म्हणजे मनात आणि चंदेल राजांनी बांधलेले खजुराहो येथील वास्तू शिल्प हे कश्यासाठी प्रसिद्ध आहेत रसिक वाचकास सांगण्याची गरज नाही .
त्यामुळे वर वर कितीही सोज्वळतेचा आव आणला तरीही प्रत्येकाच्या मनात खजुराहो हे आकार घेतच राहते!!

Monday, November 14, 2022

हे सांगायला हवं


 आजचा पुस्तक परिचय लिहायला हाती घेताना बऱ्याच दिवसांनी वाचन पूर्णत्वास गेल्याची भावना आहे .अगदी ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे ०४:०० वाजता जाग आली आणि रेंगाळत चाललेले न्या. मृदुला भाटकर लिखित "हे सांगायला हवे" हे पुस्तक वाचून संपवले.


गो नी दा च्या "शितू" नंतर मधल्या काळात  वाचन सुरूच होते पण पूर्णत्वास जात नव्हते आणि जे काही पूर्णत्वास गेले त्याचा परिचय लिहायला सुर जुळून येत नव्हते.

आज सकाळी पुस्तक हाती घेतले तेव्हा उरलेल्या पानांची संख्या बघून लक्षात आले की सकाळी ०६:०० वाजेपर्यंत पुस्तक वाचून पूर्ण होईल मग लगेच पुस्तक परिचय लिहण्याची सुरसुरी आली ."हे सांगायला हवे" हे पुस्तक  २-३ दा वेगवेगळ्या संदर्भात सुचले होते पण टायमिंग जुळून येत नव्हता. शेवटी २ आठवड्यापूर्वी झाडीपट्टीतील तूरडाळ विषयीची फेसबुक पोस्ट वाचली आणि पुस्तक वाचायचे ठरवले.

कै. श्री. रमेश भाटकर (प्रसिद्ध नाट्य आणि सिने अभिनेते ) यांना  बलात्काराच्या  खोट्या केस मध्ये ठरवून अडकविण्यात आले होते आणि ह्या एका केस ने न्या.मृदुला भाटकर आणि कै. श्री. रमेश भाटकर यांच्या जीवनात काय बदल घडवून आणले हा उपरोक्त पुस्तकांचा मूळ गाभा आहे आणि ह्या गाभ्या भोवती बऱ्याच आठवणी सरकारी व्यवस्थेतील कुरघोड्या, राजकारण्यांचा राजकीय स्वार्थासाठी न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप ,या सर्व प्रकारातून आलेल्या नैराश्य व वैफल्य याविषयीच्या कहाणी सदर पुस्तकात मांडल आहे.

न्या मृदुला भाटकर यांनी  राज्याच्या आणि देशाच्या जनमानसात सदृढ  न्याय व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करणाऱ्या बऱ्याच महत्त्व पूर्ण खटल्यांवर न्यायाधीश म्हणून काम केले व स्वतःचा ठसा उमटवला आहे . त्यात जळगाव वासनाकांड ,मुंबई लोकल बॉम्ब स्फोट , मालेगाव बॉम्ब स्फोट यासारखे महत्वपूर्ण खटल्यात न्यायमूर्ती म्हणून काम केले तसेच त्या मोक्का न्यायालयाच्या न्यायमूर्ती असताना सारा सहारा सारखे संवेदनशील प्रकरण निकाली काढले .

कदाचित त्यांच्या ह्या निष्पक्ष आणि निर्भिड न्यायदानाच्या शैली मुळे व्यवस्थेत त्यांचे बरेच हितशत्रू निर्माण झाले आणि त्यांनी पुस्तकात नमूद केल्या प्रमाणे त्यांच्या ह्या शैली ची किंमत कै रमेश भाटकर यांच्या चारित्र्यावर चिखलफेक करून हिशोब चुकते करण्याच्या किंवा त्यांना झुकवण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या सर्व प्रकाराला त्या कश्या सामोऱ्या गेल्या या सर्वासाठी तसेच,

इंटरनेटच्या क्रांती मुळे उदयास आलेल्या विविध आभासी समाज माध्यमात व २४ चालणाऱ्या वृत्त वाहिन्यात सातत्याने चालणाऱ्या  चर्चा सत्रातून  न्यायव्यवस्थेला समांतर अशी न्यायालये चालवली जाऊ लागली आहेत आणि या समांतर न्याय व्यवस्थेने जल्पकांच्या (Trollers) टोळ्या जन्माला घातल्या आहेत अशासच एका जल्पकाचा (Troller) न्या मृदुला भाटकर यांना त्यांनी एका सामजिक संस्थेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंदर्भात न्याय बुध्दीला स्मरून दिलेल्या निकालावरून सामना करावा लागला काय होता तो निकाल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व देशद्रोह म्हणजे काय विषयाची तपशील जाणून घेण्यासाठी जरूर वाचा "हे सांगायला हवं"

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...