Sunday, May 9, 2021

फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर


 

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर - कोबाद घांदी (Kobad Ghandy )

फेब्रु -२०२१ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करणारे सुधीर सूर्यवंशी लिखित  "चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र " ह्या पुस्तकांच्या परिचय लिहला त्यानंतर आज जवळ जवळ महिन्यानंतर पुस्तक परिचय लिहायला घेतला  आहे . मधल्या काळात वाचलं पण वेगवेगळ्या विषयांवर - पुस्तके अर्धवट वाचून मागे पडली अथवा शेवट पर्यंत वाचून पूर्ण  झालीत नाहीत अर्थात ती अर्धवट राहिलेली पुस्तके लवकरच वाचून  पूर्ण करणारच आहे . परंतु का कोण जाणे सध्या आजू बाजूला घडणाऱ्या गोष्टी चित्त सारखे विचलित करतायेत आणि वाचन पाहिजे तेवढ्या एकाग्रतेने होऊ शकत नाहीये.   त्यामुळे कदाचित पुस्तक पूर्ण पने  वाचून होत नाहीयेत आणि त्यावर पुस्तक परिचय राहिलेत असो मराठीत म्हटले आहे इच्छा असली तर मार्ग असतो आणि आवड असली तर सवड असते 

बऱ्याच जणांनी २०१२ च्या ऑगस्ट मध्ये श्री प्रकाश झा दिग्दर्शित अर्जुन रामपाल ,मनोज वाजपेयी ,ओम पुरी अभय देओल यांच्या प्रमुख भूमिका असणारा  "चक्रव्यूह " हा नक्षलवाद /माओवाद भारतीय संघ राज्याचा त्यांच्या बरोबर सुरु असणारा संघर्ष या विषयावर बेतलेला हा हिंदी सिनेमा बघितला असेल विसरले पण असतील . तसा हा सिनेमा काही खूप गाजला होता वा खूप काही सुपर डुपर हीट होता असे काही नाही . परंतु ह्या सिनेमाच्या प्लॉट मध्ये जो आरंभाचा  सीन आहे.  त्यात प्रा गोविंद सूर्यवंशी (स्व.ओम पुरी ) यांच्या अटकेचा प्रसंग आहे आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर केल्यावर प्रो गोविंद यांची ओळख करून दिली जाते ती अशी "यंहा से नंदीघाट तक दर्जनों अपराध दर्ज है इनके नाम ,गोविन्द राम सूर्यवंशी मुंबई के जाने माने व्यवसायी और धनी परिवार में जन्मे आपने देश के नामी डून स्कूल से पढाई करने के बाद लंदन स्कूल ऑफ़ इकोनॉमिक्स में अर्थ शास्त्र की पढाई की ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी से डॉक्टरेट करने के बाद देश लौटे और गरीबोंके शोषण से प्रभावित हो कर सब कुछ त्याग दिया और माओइस्ट मूवमेंट में जुड़ गये पिछले ३० वर्षे गोविंदजी अंडर ग्राउंड रहे और इन्हे नक्सल मूवमेंट के सबसे मुख्य आइडियोलॉग के रूप में जाना जाता हैं |" सीन सरळ आज तक ह्या हिंदी न्यूज चॅनेल च्या स्टुडिओ मध्ये जातो .

आता कदाचित प्रश्न पडला असेल कि प्रो. गोविंद सूर्यवंशी  (स्व.ओम पुरी ) ,चक्रव्यूव्ह हा २०१२ चा सिनेमा यांचा २०२१  साली आलेल्या कोबाद घांदी लिखित फ्रॅक्चरेड फ्रीडम ए प्रिझन मेमॉयर पुस्तकांशी काय संबंध असेल तर तो असा होता की डॉ मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या पहिल्या तसेच दुसऱ्या कालखंडात माओवादी चळवळींनी बरीच उचल खाल्ली होती ती किती गंभीर होती तर पशुपती (नेपाळ ) ते तिरुपती (आंध्र प्रदेश,भारत ) हा भाग रेड कॉरिडॉर म्हणून गणला जात होता (दबक्या अवस्थेत आज पण आहे ) कारण आताच एप्रिल महिन्यात छत्तीसगढ मध्ये झालेल्या माओवाद्याच्या हल्ल्यात सीआरपीएफ चे  ३३ जवान शाहिद झाले तर १ जवानाचे  माओवाद्यांनी अपहरण केले बरं मग या सर्व हिंसाचारामागे कोण आहे तर वेगवेगळ्या माध्यमातील बातमीदारानुसार त्याना नक्षलवादी म्हंटले जातात किंवा माओवादी (भारतीय कम्युनिस्ट पार्टी -माओवादी सध्या ह्या पक्षावर बंदी आहे ) म्हटले जातात किंवा माध्यम जर अति डाव्या विचारसरणीचे असेल तर त्यांना क्रांतीकारी (रेव्होल्यूशनरी ) देखील म्हटले जाते. मग कोबाद घांदी यांचा या सर्वाशी संबंध काय तर ,द हिन्दू ह्या दैनिकाने  Kobad Ghandy's arrest: Major blow to Maoist movement हा मथळा असलेली  के श्रीनिवास रेड्डी बातमीदारानें २२ सप्टेंबर २००९ रोजी दिलेल्या बातमीत वर्णन केल्या प्रमाणे कोबाद ह्या सर्वोच्च् माओवादी नेत्याच्या अटकेने भारतीय नक्षलवादी चळवळीला जोरदार धक्का बसेल मध्य भारतात मजबूत पाय रोवलेल्या ह्या संघटनेच्या दक्षिण भारतातील विस्तारावर याचा प्रतिकूल परिणाम होईल. हा (कोबाद) महत्त्वाचा नक्षलवादी नेता गेल्या दीड वर्षांपासून देशाच्या राजधानीत राहून बेल्जिअम ,पेरू ,फिलिपिन्स ,तुर्की ,जर्मनी व नेपाळ (पशुपती ते तिरुपती ) या देशातील समविचारी क्रांतिकारी संघटनांशी संपर्क साधत होता आणि त्यास दिल्ली पोलिसांनी अटक केली .

 आता कोबाद ची थोडक्यात ओळख झाली असेल पण खरोखरच कोबाद कोण आहे

कोबाद घांदी हे १९४७ मध्ये मुंबई मधील नर्गिस व अदी घांदी ह्या उच्च मध्यमवर्गीय पारशी दांपत्याच्या पोटी जन्माला आले. वडील अदी घांदी हे ग्लॅक्सो ह्या बहुराष्ट्रीय औषध निर्माण कंपनीत वित्त संचालक ह्या पदावरून सेवा निवृत्त झाले होते तर आई नर्गिस हि पाकिस्तानात असणाऱ्या मुररे ब्रेवरी ह्या प्रसिद्ध उद्योग समूह असणाऱ्या कुटुंबातुन होती. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण हे जगप्रसिद्ध डून स्कूल मधून झाले तेथील शिक्षण काळात संजय गांधी ,कमलनाथ ,नवीन पटनाईक हे  प्रसिद्ध राजकीय नेते तर गौतम व्होरा व इशात हुसैन यांच्या सारखे भारतीय खाजगी उदयॊग क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवर त्यांचे सोबती व वर्गमित्र  होते. डून स्कूल मधून शालेय शिक्षण तर मुंबईतील झेविअर्स या महाविद्यालयांतूनरसायन शास्त्रात बी एस्सी केल्यावर १९६८ मध्ये ते लंडनला सनदी लेखापाल होण्यासाठी गेले तेथील वास्तव्यात त्यांचा परिचय डाव्या विचारसरणीशी घडला व त्याच दरम्यान लंडन मधील वर्ण द्वेषाचा अनुभव आला व या  वर्ण द्वेष आणि भांडवलशाही  विरुद्ध आवाज उठवण्यासाठी चौक सभा घेतल्या प्रकरणी लंडन कोर्टात ३ महिने सक्त मजुरीची शिक्षा पण भोगावी लागली .तिथून एका सुखवस्तू कुटुंबातील उच्च शिक्षित कोबाद चा  प्रवास हा मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून सुरु झाला . त्याची परिणीती त्यांनी १९७२ मध्ये सनदी लेखापालची पदवी न घेता मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला . 

६०-८० चे दशक हे जगात सर्वत्र वेगवेगळ्या चळवळीचे दशक मानले जाते . त्याकाळीतील  भारतात देखील बऱ्याच राजकीय ,सामाजिक घडामोडी आणि उलथापालथी घडत होत्या ,प्रथापितांविरुद्ध संघर्ष सुरु झाला त्यात महाराष्ट्रात दलित पॅन्थर च्या दलित पॅन्थर ने २५ वा स्वातंत्र्यदिन हा काळा  स्वातंत्र्य दिन म्ह्णून साजरा केला होता  तर नामदेव ढसाळ आपल्या जहाल शब्दातून व्यवस्थेविरुद्ध अंगार फुलवत होत्या त्याच्या "तुझे बोट धरून चाललो आहे" कवितेच्या खालील ओळी विद्रोहाचा प्रत्येय आणून देतात.

 

हा भाकरीचा जाहीरनामा

हा संसदेचा रंडीखाना

ही देश नावाची आई

राजरोस निजते कुबेराच्या सोबत

किंवा

तेच तेवढे आले आईच्या उदरातून ?

बाकीचे कुत्रा मांजराच्या

विद्रोही चळवळीने जोर धरला होता तसा तो कालखंड हा रोमँटिसिसम चा कालखंड मानला जातो ,जगातील तरुणाई ही  डाव्या चळवळीच्या मोठ्या प्रमाणात आकृष्ट झाली होती हे रोमँटिसिसम म्हणजे किती तर २०१० च्या प्रकाश झा यांच्या  " राजनीती " ह्या चित्रपटातील भारती राय ह्या युवतीने कॉ भास्कर सन्याल यांच्या नेतृत्त्वाखाली झेंडा घेऊन ज्या प्रमाणे आपल्या मुख्यमंत्री वडिलांच्या राजकीय प्रचार सभेतच बंडाचा झेंडा धरला होता त्याप्रमाणे ह्या चित्रपटातील दाखल्या  व्यतिरिक्त वास्तविक उदाहरण द्यायचे झाले तर काल परवा बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपा चे स्टार प्रचारक व कोब्रा असणारे श्री मिथुन चक्रवर्ती हे देखील नक्षलवादी चळवळीशी संबधीत होते तर असे एकदा ऐकले होते कि श्री गडकरी (रॊडकरी ) साहेबांना देखील ह्या चळवळीचे आकर्षण होते.

ह्या सर्व भारावलेल्या कालखंडात कोबाद ने  प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) तर्फे रुईया महाविद्यालयात घेण्यात "वैकल्पिक विद्यापीठ" (Alternative University ) च्या उन्हाळी  वर्गांना हजेरी लावली . ही प्रोग्रेससीव्ह युथ मोव्हमेंट (प्रोयोएम/PROYOM ) नक्षलवाद्याशी संबधित असणाऱ्या जनशक्ती ह्या संघटनेचे एक अंग होते त्यातून कोबाद चा परिचय दलित पॅन्थर , आव्हान ह्या संघटना बरोबर होत घेला त्यातून त्याने समाजातील दबलेल्या वर्गासाठी काम करण्याकरिता वरळीतील मायानगर ही दलित बहुल झोपडपट्टीतील मुलांसाठी तो वर्ग घेऊ लागला तसे त्याकाळी मुंबईत चालणाऱ्या कामगार चळवळीच्या देखील तो संपर्कात होता . दरम्यानच्या काळात कोबाद चा अनुराधा शानभाग ह्या एल्फिन्स्टन कॉलेज मधील विदयार्थी नेता असणाऱ्या समविचारी युवतीशी परिचय झाला दोघांचे एकमेकांवर प्रेम जुळले व त्यांचा प्रेम विवाह झाला . कोबाद आणि अनुराधा ही जोडी तशी एकमेकांना अनुरूप अशी जोडी होती अनुराधाच्या घरची पार्श्वभूमी ही  खुल्या व कम्युनिस्ट विचारसरणीची त्यामुळे तीही मुंबईतील त्या काळात घडणाऱ्या चळवळीत हिरहिरीने सहभागी होती . याव्यतिरिक्त ती देखील समाज शास्त्राची द्वि पदवीधर होती व पुढे ज्यावेळी ह्या दाम्पत्याने १९८२ ला नागपूर मध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला त्या वेळी तिने नागपूर विद्यापीठात प्राध्यापकी पण केली.

१९८२ नागपूर ते पुढील १५ वर्षे नंतर अनुराधाचे २ वर्षे बस्तर मध्ये अधिवास  तेथील आदिवासी स्त्रियांसाठी वर्ग  व त्यात तिला झालेल्या फाल्सीपेरम मलेरिया या रोगाची लागण व पुढे २००८ ला मुबंईत स्केलरॉसीसने निधन आणि २००९ ला कोबाद ला अटक व पुढे दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखला जाणाऱ्या यूएपीए (Unlawful Activities Prevention Act),भारतीय दंडविधान संहिताच्या (IPC ) कायद्याच्या वेगवेगळ्या कलमाखाली पुढील १० वर्षासाठी तुरुंगवास भोगावा लागला .

 खरोखरच कोबाद काही देश विघातक कारवाया करत होता का ? त्याच्यावर भारताच्या विविध राज्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे सिध्द झालेत का ?कोबाद खरोखरच या सर्व तुरूंगवासास पात्र होता या सह भारतीय राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले मूलभूत हक्क खरोखरच देशातील सर्व नागरिकांत समान आहेत कि ज्याप्रमाणे जॉर्ज ऑर्वेल च्या ऍनिमल फार्म ह्या कादंबरीत नमूद केले आहे त्याप्रमाणे "All are equal some are equal" ही परिस्थिती आहे की संविधानाच्या सरनाम्यात आश्वासित केलेल्या  न्याय ,समानता,स्वातंत्र्य , व बंधुत्व या मूल्यांवर आधारित सार्वभौम ,समाजवादी ,धर्मनिरपेक्ष व लोकशाही संघराज्य   आहे.

खरोखरच सर्वाना न्याय मिळतो का आणि कोबाद ला न्याय मिळाला का या आणि अधिक माहिती साठी जरूर वाचा

फ्रॅक्चरेड फ्रीडम प्रिझन मेमॉयर- कोबाद घांदी (Kobad Ghandy )

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...