Monday, February 8, 2021

चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र

 




चेकमेट हाऊ बीजेपी वन अँड लॉस्ट महाराष्ट्र (Checkmate: How the BJP Won and Lost Maharashtra)


चेकमेट हाऊ बी जे पी विन अँड लॉस्ट महाराष्ट्र हे श्री सुधीर सुर्यवंशी लिखित २९६ पानी पुस्तक गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारच्या अधिक योग्य पणे सांगायचं झाल्यास महा विकास आघाडी सरकार स्थापनेचा विस्तृत आढावा घेणारे पुस्तक आहे .२०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या राजकीय घटनाक्रमाचा धांडोळा घेणारी इंग्रजी भाषेत चेकमेट सह अजून कमलेश सुतार लिखित '३६ डेज : ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अॅण्ड बिट्रेयल' व जितेंद्र दीक्षित लिखित '३५ डेज : हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज्ड फॉरेव्हर इन २०१९' पुस्तके आलीत .पण विचारांती चेकमेट ला अंतिम पसंती आणि पुस्तक माझ्या संग्रही आले.
महाराष्ट्राची १४ व्या विधानसभेची निवडणूक कार्यक्रम, प्रत्यक्ष मतदान व त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी रंगलेले राजकारणाचे विविध खेळ नी वेगवेगळ्या आघाड्या या सर्वासाठी ही निवडणूक सर्वार्थाने गाजली .
अर्थात निवडणुका ,मतदान ,सरकार स्थापना थोडक्यात लोकशाही चे हे अंग १९९६ च्या लोकसभा निवडणुकी नंतर थोडं थोडं समजायला लागलं आणि त्यात जास्त रस निर्माण व्हायला लागला . सुरवातीला आजच्या सत्ताधारी पक्षाच्या विचारांनी भुरळ घातली परंतु का कोण जाणे कालांतराने सर्वच पक्षीय विचारधाराचा तटस्थ पणे धांडोळण्यात अधिक रुची वाटू लागली . अगदी शेतकरी कामगार पक्ष ,हिंदू महासभा ,फॉरवर्ड ब्लॉक ते काँग्रेस ,बी जे पी ,शिवसेना ,भाकप ,माकप ,लाल निशाण पक्ष आणि अगदी तरुण असणारे मनसे नी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच पक्षाच्या ध्येय धोरणांचा ,राजकीय विचारांचा ,स्थापनेचा आणि उगमाचा,तडजोडीचा (पक्षीय ,राजकीय ),आघाड्यांचा थोडाबहू इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतोय .
भारताच्या राज्यघटनेचे स्वरूप संघराज्यिय स्वरूपाचे आहे त्यामुळे कदाचित नेशन (राष्ट्र ) विरुद्ध स्टेट (राज्य) हा कायमस्वरूपी भेद व वाद राहिला आहे .मग कधी त्याचे स्वरूप कधी भाषिक असते तर प्रांतिक अस्मितेचा असते त्या वादाचे पडसाद महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी उमटून गेले होते मुंबई सह महाराष्ट्र की मुंबई विना महाराष्ट्र असे असेल किंवा अजूनही सुरु असलेल्या बेळगाव ,कारवार,निपाणी व भालकी महाराष्ट्रात आल्याचं पाहिजेत किंवा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे इथपर्यंत टिकून आहे . ह्या सर्व वादाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर व सत्ता सोपानावर सतत परिणाम झाले आहे कधी क्षमता असूनही योग्य पदासाठी महाराष्ट्रातील नेते डावलले गेले किंवा महाराष्ट्रात केंद्रीय नेतृत्त्वाला सोयीचे नेत्यांना नेतृत्व सोपवण्यात आले .
सर्वसाधारणपणे केंद्रात राजीव गांधी यांचे सरकार हे एकपक्षीय सत्ता व संपूर्ण बहुमत असणारे शेवटचं सरकार होते . त्या आधी कै मोरारजी भाई देसाई व चौधरी चरण सिंह यांच्या काळात केंद्रात आघाडीच्या राजकारणाचा प्रयोग (काँग्रेस विरुद्ध सारे ) असा झाला होता . पण १९८९ च्या ९ व्या लोकसभेपासून ते २०१४ च्या १६व्या लोकसभेच्या काळ हा केंद्रात आघाडीच्या सरकारचा आणि राजकारणाचा होता . तर महाराष्ट्राच्या विधानसभेत १९७८ च्या निवडणुकीपावेतो काँग्रेस ची एकपक्षीय सत्ता होती . अगदीच महाराष्ट्र्र टाइम्सचे तत्कालीन संपादक दिवंगत गोविंदराव तळवलकर यांच्या शब्दात सांगायचे झाल्यास "हे राज्य जावे, ही श्री ची इच्छा" पासून ते "पाठीत खंजीर खुपसला" नी महाराष्ट्रात आघाडीच्या सरकारची स्थापना झाली .
१९७८ च्या श्री शरद पवार साहेब यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली . १९७८ ची निवडणूक आणि २०१९ ची निवडणूक थोड्याबहू अर्थाने काही साम्य स्थळे असणारी आहे . अर्थात आ. पवार साहेब हे नशीबवान नेते आहेत ते यासाठी कारण १९७८च्या निवडणुकीत जनता पार्टी हा ९९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष होता व जनता पार्टी तर्फे उत्तर महाराष्ट्रातीलच पैगंबरवासी निहाल अहमद (मालेगाव ) व स्व उत्तमराव पाटील (पारोळा-भडगाव ) यांच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू होती पण पवार साहेबांनी बेरजेचे राजकारण करत या दोन्ही नेत्यांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून सरकार स्थापन करून टाकले व उत्तर महाराष्ट्रापासून दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पद दूर गेले . याही आधी कै भाऊसाहेब हिरेंना पण एकदा मुख्यमंत्री पदाने चकवा दिला होता .
अर्थात या निवडणुकींनी पवार साहेबांची विश्वासहार्यतेवर कायमस्वरूपी एक प्रकारचे प्रश्नश्चिन्ह निर्माण झाले तरीदेखील पवार साहेब सर्वाधिक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत आणि अजूनही महाराष्ट्राच्या जनतेवर व राजकारणावर त्यांचा करिष्मा,गारुड टिकून आहेत.असे असले तरीदेखील कै .वसंतराव चव्हाण या वैदर्भीय नेत्यांचा अपवाद वगळता १३ व्या विधानसभेत श्री देवेंद्र फडणवीस हे वैदर्भीय नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होई पर्यंत कोणतेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ५ वर्षांचा आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही अगदी स्व यशवंतराव चव्हाण साहेब देखील नाही . श्री देवेंन्द्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी टिकणारे पहिले बिन काँग्रेसी मुख्यमंत्री होते कारण याआधीचे सेना भाजप युतीच्या सरकारने आपला कार्यकाळ देखील पूर्ण न करता १९९९ मध्ये विधान सभेच्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकी सोबत घेण्यासाठी श्री नारायण राणे यांनी आधीच राजीनामा दिला होता .
प्रस्तुत पुस्तक हे एकूण १८ प्रकरणात विभागले गेले आहे पुस्तकांची सुरवात ही अ रिसाऊंडिंग व्हिक्टरी या प्रकरणाद्वारे होते त्यात २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल आणि भाजपाला मिळालेले स्पष्ट बहुमत ,सर्व विरोधी पक्षांची झालेली पीछेहाट याचा आढावा आणि भाजपाचे जनमानसात घट्ट होत असलेले स्थान व टिकून राहिलेले मोदी लाट यावर भाष्य करते तर ,बर्थ ऑफ महाराष्ट्रा यात महाराष्ट्राची जन्मकथा ,संयुक्त महाराष्ट्राचा लढा व तेव्हा पासून रूढ झालेला मराठी विरुद्ध गुजराथी हा वाद पण अधोरेखित करते ,पुढे इमरजन्स ऑफ शिवसेना या प्रकरणात शिवसेनेची स्थापना व वाटचाल . तत्कालीन मराठी माणसाची मुंबईतील स्थिती यावर अगदी मुंबईतील गुजराथी भाषिकांकडून वापरण्यात येणाऱ्या भांडी घासा आमची बॉम्बे घ्या तुमची हे समर्पक विधान वापरात स्पष्ट केली आणि त्यातून पुढे शिवसेनेच्या वेळोवेळो घेतलेल्या भूमिका ही सांगितल्या आहे . अगदी सेनेचा कम्युनिस्टा बरोबर असलेला वाद ,परळचे आमदार कृष्णा देसाई यांचा खून, सेनेची वसंत सेना ही संभावना ,सेना व काँग्रेस यांची राजकीय जवळीक करिअप्पा यांना दिलेला पाठिंबा , पुढे सेनेने धरलेली हिंदुत्त्वाची कास रिडल्स चे प्रकरण असेल किंवा मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीच्या काळात गाजलेली घरात नाही पीठ कशाला हवे विद्यापीठ ही भूमिका असेल या सर्वांचा आढावा घेत २०१९ च्या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील श्री आदित्य ठाकरे निवडणुकीला उभे राहिल्या केम छो वरली म्हणत मतांचा मागलेला जोगवा असेल या सर्वावर प्रकाश टाकला आहे .

युद्धात आणि प्रेमात सर्व काही माफ असते त्या प्रमाणे राजकारणात ही कोणी कोणाचा काही कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू राहत नाहीत . अगदी शिवसेनेची मुंबईत काही काळासाठी मुस्लिम लीग सोबत युती होती (त्यासंदर्भात वंदनीय बाळासाहेबांनी जि एम बनातवाला यांच्या सोबत व्यासपीठावरून प्रचार करतानाचे छायाचित्र राज ठाकरे यांनी प्रकाशित केलेल्या फोटो बायोग्राफीत आहेत ) .शिवसेनेनं हिंदुत्वाची कास धरल्यावर भाजपाशी नैसर्गिक युती झाली पण २०१४ च्या १९८५ मध्ये आधी एकदा भाजपा सेनेला एकटे सोडून पवार साहेबाच्या समाजवादी काँग्रेस सोबत गेल्याचा इतिहास आहे . कदाचित ह्याच १९८५ च्या संबंधातून २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस ने भाजपाला महाराष्ट्रातील सरकार स्थापन करायला मदत केली असेल का ?

या सर्वांसह अजित दादा पवार यांच्या वर बऱ्याच विस्तृत पणे लिहलेलं आहे व अजित दादा यांच्या वर पवार साहेबांचे प्रेम अधोरेखित करणारे राजकारण गेले चुलीत मला माझा अजित पाहिजे हे खुमासदार तितकेच हृदयस्पर्शी वाक्य देखील चपखल पणे पेरले आहे

पुढे २०१४ च्या भाजपा व राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा ,पुन्हा एकदा २०१७ मध्ये भाजपा राष्ट्रवादी यांची एकत्र येण्याची तयारी व या सर्वात अजित दादा यांचे फडणवीस यांच्या सोबत पहाटे ५ वाजता सरकार स्थापन करण्याचा निर्णय यांचे मूळ . याच सह आमदाराची झालेली पळवापळवी हरियाणातून राष्ट्रवादीच्या आमदाराची सुटका ,जयपूरला पंचतारांकित रिसॉर्ट मध्ये पिठले भाकरी मागणाऱ्या आमदारांचा खुमासदार किस्सा यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे .

या पुस्तकांच्या लेखकाविषयी मला थोडे विस्तृत पणे लिहावेसे वाटते कारण श्री सुधीर सूर्यवंशी हे डीएनए ह्या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करत होते परंतु आर्थिक कारणामुळे २०१९ मध्ये डीएनएने त्यांच्या छापील आवृत्या बंद करण्याचा निर्णय घेतला व त्यामुळे श्री सुधीर नोकरीतून बाहेर पडले . वृत्तपत्र बंद होण्यामुळे ते नुसते नोकरीतून बाहेर पडले नव्हते तर त्यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा पत्रकार म्हणुन मागोवा घेण्यापासून वंचित करणारी ही घटना होती . पण म्हणतात इच्छा असेल तर मार्ग असतो . त्या इच्छेला साथ मिळाली समाजमाध्यमाची त्यांनी ट्विटर वर कट्टान्यूज हे हँडल सुरु केले त्या माध्यमातून विधानसभेच्या निवडणुकीच्या वार्ताकंनाची सुरवात केली .ह्याच कट्टा न्यूज च्या माध्यमातून २० नोव्हे २०१९ रोजी दुपारी ०१:०६ वाजता केल्या ट्विट द्वारे अजित दादा हे राष्ट्रवादीतून ३५ आमदारांसह बाहेर पडून भाजपा सोबत सरकार स्थापन करणार हे जाहीर करण्यात आले होते आणि नंतर घडला तो सर्व इतिहास आपल्या सर्वांसमोर आहेच .


Like
Comment
Share

तेलगी एक रिपोर्टर की डायरी संजय सिंह

 तेलगी एक रिपोर्टर की डायरी स्कॅम २००३ ही वेब सिरीज चा टीझर रोज बघण्यात येत होता पण काना डोळा करायचा प्रयत्न करत होतो कारण सोनी लिव्ह चे सबस...